सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी   

विद्याधर नारगोळकर यांचे प्रतिपादन 

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे युवकांना प्रेरणा देणारे आहेत. घराघरात पालकांनी सावरकरांचे विचार मुलांना सांगून त्यांच्यावर प्रखर हिंदुत्ववाद बिंबवावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला देशासाठीचा महान त्याग हा नक्कीच विद्यार्थ्यांसह युवकांना देशाप्रती आत्मीयता व प्रेम जागृत करणारा आहे. असे मत विद्याधर नारगोळकर यांनी बुधवारी व्यक्त केले. 
 
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्राच्या वतीने काल स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त पिरंगुट येथील अमृतवेल या सामाजिक संस्थेस व्हील चेअर प्रदान करण्यात आली. त्यानिमित्त ते बोलत होते. यावेळी अमृतवेल संस्थेचे मिलिंद बेवळणकर यांनी कृतज्ञता व्यक्त करून संस्था करीत असलेले कार्य नक्कीच समाजाने प्रेरणा घेणारे आहे, अशा भावना व्यक्त केली. यावेळी केंद्रप्रमुख मकरंद माणकिकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव उपस्थित होते. मकरंद मांणकीकर यांनी संस्था परिचय करून दिला. या कार्यक्रमाला मधुसूदन दाबक, शारंगधर अभ्यंकर, भालचंद्र खाराईत, अनघा जोशी, नीता पारखी, उल्हास पाठक, मुकुंद जोशी, माधव ताटके उपस्थित होते. 

Related Articles